मनरेगा कामगाराच्या 15 वर्षाच्या लहानग्याने शोधले पुराशी झुंज देणाऱ्या शेतीचे शाश्वत मॉडेल

ही यशोगाथा आहे केरळ राज्यातील पर्यटनस्थळ अलाप्पुझाजवळील कुट्टानाड येथील 15 वर्षांच्या लहानग्याची! त्याची आई मनरेगा कामगार. या शाळकरी मुलाने पुराशी झुंज देणाऱ्या शेतीचे शाश्वत मॉडेल विकसित केले आहे. त्याला केरळ सरकारच्या कृषी विभागाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकऱ्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.

कुट्टनाड जिल्ह्यामधील मिश्राकरी येथील अर्जुन अशोक या पंधरा वर्षीय मुलाने केरळ राज्यातील कृषी विभागाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकऱ्याचा पुरस्कार पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वारंवार येणाऱ्या पुरामुळे निर्माण झालेल्या आव्हानांशी झुंज देत त्याने शेतीतील यशोगाथा लिहिली. त्याच्या मॉडेलने सततच्या पुरामुळे शेतीत नुकसान सहन करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे.

लहान वयातच कळत-नकळत शेतीकडे अर्जुन लहान वयातच कळत-नकळत शेतीकडे ओढला गेला, त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तो म्हणतो, “अगदी लहान वयातच शेतीची पहिली पायरी मी आईकडून शिकलो. मनरेगा कामगार असलेल्या माझ्या आईने माझी शेतीची आवड ओळखली आणि मला प्रोत्साहन दिले. मी वयाच्या दहाव्या वर्षीच छोट्या प्रमाणात का होईना, पण स्वतः भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली.”

  • Related Posts

    आदिवासी महिला शेतकरी झाल्या कृषी उद्योजक ; आता कोट्यावधी रुपयांचा शेती व्यवसाय

    Read more

    पडीक जमिनीत दोघींनी नैसर्गिक शेतीतून फुलवला लोकबगीचा !

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    • May 28, 2025
    खरीप  पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    • May 28, 2025

    सोयाबीनला मिळणार 5328 रुपये हमीभाव

    • May 28, 2025

    मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    • May 27, 2025
    • May 27, 2025

    30 मे पर्यंत राज्यात पाऊस पडणार

    • May 27, 2025