खुशखबर… आता साठवणुकीत कांदा खराब होण्याची कटकटच मिटली; काय आहे BARC, ‘इन्फ्राकूल’चे नवीन तंत्रज्ञान?

सरकारचे बदलते धोरण आणि चांगले उत्पादन करूनही मालाला योग्य भाव मिळत नसल्याने हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता साठवणुकीत कांदा खराब होण्याची कटकटच मिटली आहे. भाभा अणू संशोधन केंद्र BARC आणि ‘इन्फ्राकूल’ कंपनीचे हे नवीन तंत्रज्ञान काय आहे ते आपण जाणून घेऊया. प्रत्यक्ष संबंधित तज्ञांना भेटून त्यांच्याकडून या नव्या तंत्राची माहिती मिळवायची असेल तर आपण प्रमिला लॉन्स, पिंपळगाव बसवंत येथे 12 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित होत असलेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला जरूर भेट द्या.

‘इन्फ्राकूल’ कंपनीच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे जेव्हा बाजारात कांद्याला चांगला भाव असेल तेव्हाच तो विक्रीला बाहेर काढता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे व्यापारी, कमिशन एजंट, आडते-दलालांचा नव्हे तर थेट शेतकऱ्यांचाच मोठा फायदा होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणार आहे. भाभा संशोधन केंद्र म्हणजेच ‘बीएआरसी’ने विकसित केलेल्या या नव्या तंत्रज्ञानासाठी पायाभूत नियंत्रित उभारणी करून ‘इन्फ्राकूल’ कंपनीने यशस्वी चाचणी पार पाडली.

  • Related Posts

    लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या कृषी धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    • May 28, 2025
    खरीप  पिकाच्या हमीभावात वाढ केंद्राचा निर्णय

    कापसाच्या हमीभावात 559 रुपये वाढ

    • May 28, 2025

    सोयाबीनला मिळणार 5328 रुपये हमीभाव

    • May 28, 2025

    मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    • May 27, 2025
    • May 27, 2025

    30 मे पर्यंत राज्यात पाऊस पडणार

    • May 27, 2025